पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अक्षरांशी जडले नाते!!

गेल्या दोन महिन्यांत हो नाही करता करता शेवटी सोशल मीडिया ला राम राम ठोकला. सतत चे नको असलेले अपडेट्स, आत्यंतिक राजकीय आणि धार्मिक मतांमुळे दिसणारी आपल्याच मित्रपरिवाराची भेसूर स्वरूपं आणि अर्थशून्य तर्हेने घालवलेला वेळ ह्या सगळ्यांपासून फारकत घेतली. थोडा वेळ आणि प्रयत्न लागले पण जमलं! भरपूर पुस्तकं वाचायची हे ठरवून परत अक्षरांकडे वळले. वाचन तसं सुरू होतंच पण ह्या फेसबुक ट्विटर च्या कोलाहलात ते आतपर्यंत पोचत नव्हतं.  सुरुवातीला त्रासच झाला. सर्वसुखसोयींनी सुसज्ज असलेल्या शहरातल्या नवीन घरातून गावातल्या जुन्या वाड्यात गेल्यावर कसं वाटेल, तसं काहीसं. इथे आता फक्त मी आणि ही अक्षरे..मनात आलं तर पटकन ऐकायला एखादं गाणं नव्हतं की वाटलं तर एखादा मेसेज टाकून गप्पा मारायला कोणी मित्र मैत्रिण नव्हते. काय करू या अक्षरांचं?? पण लहानपणापासून ह्या अक्षरांशी असलेल्या सलगीवर विश्वास ठेवला आणि परत एकदा वाचन सुरू केलं.  मला आठवतंय तेव्हापासून मी वाचायचे. नुसतं पुस्तक वाचायचे असं म्हणणार नाही कारण घरी येणारा प्रत्येक कागद माझ्या डोळ्यांखालून गेलाच पाहिजे हा माझा दंडक होता. वाण सामान बांधून आले...

तत्त्वमसि

एखाद्या प्रगत संस्कृतीला तुम्ही कुठल्या परिमाणांवर तोलता असा प्रश्न कुणी तुम्हाला केला तर काय उत्तर द्याल? कदाचित तुमच्या सभोवतालची परिस्थिती पाहून आणि ती तुमच्या मनाला पटणारी असल्याने त्यावरून भाष्य कराल. भौतिक निकष लावून उत्तर द्याल. कदाचित तुमच्या मान्यतेविरुद्ध जगणाऱ्या समूहाला असंस्कृत मानून त्यांना सुधारण्याचे काम कराल. त्यांचा उत्कर्ष करून त्यांना तुमच्यासारखं 'प्रगल्भ' बनवण्याचा कळकळीने प्रयत्न कराल. कराल ना? पण समजा त्या तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हालाच अवचित स्वतः बद्दल प्रश्न पडायला लागले तर? आजवर गोळा केलेल्या ज्ञानाच्या सत्यासत्यतेबद्दल उलट तुमचंच चिंतन घडायला लागलं तर? तुम्ही मनात धरून चाललेल्या प्रमेयांच्या पायवाटेवर अचानक विरुद्ध दिशेने तुमचा प्रवास सुरु झाला तर? ह्या विचारांच्या गाभ्यावर ध्रुव भट्ट लिखित 'तत्त्वमसि' ह्या पुस्तकाचा प्रवास घडतो. मुळात एका प्रवासाची गोष्ट असलेले हे पुस्तक वाचकाला बोटाला धरून एका आत्मशोधाच्या यात्रेला नेते. पुस्तक अतिशय सध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलेलं आहे. जडशीळ शब्द वापरून, वाचकाला त्याच्या ओझ्याखाली दाबून टाकत नाही. कुठ...

अश्विन शुद्ध पक्षी...

इमेज
स्त्रीत्वाचा, आदीशक्तीचा सगळ्यात मनोहारी सोहळा येऊ घातलाय..नेहमीचं विश्व असतं, तर ह्या क्षणी सगळीकडे झगमगाट असता, टाळ्यांच्या गजरात, शंखध्वनी करत तिचं आवाहन झालं असतं, रंगीबेरंगी रेशमी वस्त्र परिधान करून तिच्या कौतुकात रात्र रात्र गरबा करून जागवली असती. पूजा अर्चना, आरत्यानी आसमंत दुमदुमला असता. पण जग बदललंय. ह्यावर्षी देवीदेवतांचे उत्सव सरकारी परवान्यांचे धार्जिणे झाले आहेत. मंदिरांची किवाडे अजून उघडली नाहीत. मूर्त्यांचे, दर्शनाचे नियम आखल्या गेले आहेत. जीव उधळून सण साजरे करणारे लोक स्वतःचा जीव जपायची धडपड करतायत. खरतर ह्या विश्वव्यापी शक्तीबद्दल बोलायची माझी मुळीच पात्रता नाही. तरीही आज पृथ्वीवर अवतरलेल्या पण या वर्षी नजरेस न पडणाऱ्या जगन्मातेबद्दल आणि तिच्या मी अनुभवलेल्या पर्वाबद्दल लिहिण्याचा हा अत्यन्त तोकडा प्रयत्न! मला कळायला लागलं तेव्हापासून माहेरी साजरे होत असलेले शारदीय नवरात्र मला आठवते आहे. नवरात्राचा आणि माझा संबंध आम्ही मुंबई सोडून नागपूरला गेल्यावर आला. त्या वर्षी पहिल्यांदा घरचं नवरात्र पाहिलं तेव्हा मला देवीची भयंकर धास्ती होती. देवी बसते म्हणजे कुठे बसते, कशी दिसते...