पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लखलख चंदेरी...

इमेज
माझ्या आईकडे एक जुनी भरजरी शाल होती. कोणीतरी भेट दिलेली. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेली ही पहिली भरजरी शाल! सोनेरी, निळ्या, जांभळ्या रंगाच्या रेशमाने विणलेल्या ह्या शालीचं मला खूप अप्रूप होतं. जपून ठेवलेली ही शाल फक्त सणासमारंभाला बाहेर निघत असे. तिचा मुख्यत्वे उपयोग औक्षण करताना, ओवाळताना पाटावर अंथरायला करत असू. ती भरजरी शाल ही माझी दिवाळीची पहिली आणि खूप जवळची आठवण आहे. ती शाल पेटीबाहेर निघाली की दिवाळी आल्याची नांदी मिळायची. तिला नीट इस्त्री करून निगुतीने जतन करून ठेवायचो. कालपरत्वे ती कोपऱ्यातून विरायला लागली. मग ती विरलेली बाजू दृष्टीस पडू नये म्हणून नेमकी गुंडाळून आम्ही वापरायला लागलो. दिवाळी पण अशीच! भरजरी!! मनात असलेली दुःख, चिंता, काळज्या क्षणभर दुमडून साजरी करायची. तिचं स्वरूप आता बदललंय. लहानपणी ती ५ दिवस मला मी राजकन्या असल्यासारखं भासवायची. त्या भरजरी शालीमार्फत, मोती साबणाच्या गुलाबाच्या सुगंधातून, भल्या पहाटे उठून केलेल्या औक्षणातून, आणि माझ्या आंघोळीच्या वेळी बाहेर ताईने उडवलेल्या मोठ्ठया आवाजाच्या फटाक्यातून, तिने माझे भरपूर लाड केले. हळूहळू ह्या स्वप्नांच्या राज्यातून...

म्हैसूर सिल्क आणि बरंच काही

जुन्या घरातून दुसऱ्या घरी सामानाची अदलाबदल सुरु होती. कधीतरी कामी येतील म्हणून ठेवलेल्या कितीतरी वस्तूंची आता गरज नाही हे लक्ष्यात आल्यामुळे, वेगवेगळ्या प्रभागात रवानगी करत होते. सरळ फेकून देणे, गरजूना वाटणे, आश्रमात नेऊन देणे किंवा स्वत:बरोबर पुढे घेऊन जाणे हे मुख्य विभाग. अचानक हाती एक साडीचं बोचकं लागलं. सहा वर्षात कधी न बघितलेल्या साड्या अचानक झुळझुळत बाहेर पडल्या. सवयीप्रमाणे प्रत्येकीला नीट न्हाऊ माखू घालून 'ड्राय क्लिनिंग' चं तीट लावून ठेवलं होतं. मी अक्षरश: आनंदाने चित्कारले. ह्या साड्या अंगाला लागून किती वर्षे लोटली होती! प्रत्येकीची स्वतःची कहाणी आणि आठवण. नोकरीनिमित्त गरज होती तेव्हा घेतलेल्या शिफॉन किंवा तत्सम प्रकारातल्या 'लाइटवेट' साड्या, एक दोन थेट लग्नातल्या जरीकाठी आणि नंतर फारश्या न नेसल्या गेलेल्या, एखादी अशीच कोणीतरी भेट म्हणून दिलेली. सगळ्यात शेवटी हाताला अलगद एक म्हैसूर सिल्क लागली. कण्हेरीच्या फुलाच्या रंगाची, नेव्ही ब्लू काठ असलेली. दोन पिढ्यांच अंतर कापून माझ्यापर्यंत पोचलेली. अचानक शहारा आला. कमीत कमी 35/40 वर्षे जुनी साडी असेल. माझ्या आजीची सा...

महागायक

किशोरकुमारवर काही लिहायचं म्हणजे खूप धाडस पाहिजे. एकतर तो चित्रपटसंगीत जगतामधील बापमाणूस!! ऑथोरिटी एकदम! त्यात त्याच्यात आकंठ बुडालेल्या चाहत्यांचा अजस्त्र मोठा कळप आहे. कुठे एखादा शब्द कमीजास्त लिहिल्या गेला, तर (कमीतकमी digitally) चाल करून येणारा घोळका थोपवू शकणार असाल तरच लिहावं! हा असा फॅन्कलब भारतात फार कमी जणांच्या नशिबात आलाय. त्याच्या पश्चात इतकी दशके उलटून गेली तरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे लोक लाभलेत यावरून त्याची पुण्याई लक्षात यावी! पण तरी आज (त्या फॅनक्लब ची भीती दूर सारून) हिम्मत करून त्याच्यावर चार ओळी लिहिणार आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा असलेल्या महागायकाबद्दल थोडी कृतज्ञता म्हणून! खरंतर मी किशोर ची निस्सीम चाहती नाही! (There..I said it!). मी त्याला तासंतास ऐकते. पण मधूनच रफीचं 'लिखे तुझे खत तुझे' ऐकू येतं..मधेच लताच 'ये रातें नई पुरानी' वाजतं, अचानक आशाचं 'साथी रे, भूल ना जाना मेरा प्यार' कासावीस करून जातं आणि मी मग किशोरला विसरून ह्या सगळ्या मंडळींमध्ये रमते. कुठे मर्मभेदी बोल, कुठे काळीज चिरत जाणारे आर्त स्वर, कुठे ...

मधुबन खुशबू देता है....

रोज संध्याकाळी चालायला जाते तेव्हाचे माझे दोन नियम आहेत. मावळत्या सूर्याचे आणि सप्तरंगी आकाशाचे फोटो काढायचे आणि रोज कुठलातरी genre पकडून गाणी ऐकायची. मग एखाद्या दिवशी थेट किशोरी आमोणकर असतात सोबतीला, एखाद्या दिवशी चक्क सुनिधी चौहान, कधी लता, आशा, रफी, किशोरदा हे दिग्गज तर कधी अरिजीत सिंग, श्रेया घोषाल हे नव्या दमाचे गायक; कधी जुने नावाजलेले संगीत दिग्दर्शक तर कधी हल्लीचे गोंगाटमय संगीतज्ञ. एखाद्या दिवशी भक्तीरस तर लगेच दुसऱ्या दिवशी 90 च्या दशकतील इंडिपॉप! त्यात आता 'आमच्यावेळी खूप सुरेल संगीत असायचं, आताच्या गाण्यांना काही अर्थ नाही' अशी कुरकुर करण्याइतकं वय पण वाढलंय. अश्यात कधीतरी अचानक एखाद जुनं पण त्यावेळी त्यात फार इंटरेस्ट न घेतलेलं गाणं कानावर पडतं. वर्तमान परिस्थित सतत 'हिरीये, सोनिये' ऐकून ऐकून विटलेले आपले कान एखाद्या सुमधूर गाण्यासाठी किती हपापले होते ते जाणवतं. त्यादिवशी अचानक येसूदास यांनी गायलेलं "मधुबन खुशबू देता है.." लागलं आणि चालता चालता चक्क डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी  कधी नीट ऐकलंच नव्हतं. इतके सुंदर बोल, इतका सुरेख भावार्थ! साधा, सरळ, सक...

कौसल्येचा राम

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम। भाबड्या ह्या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।। माणिक वर्मा ह्यानि गायलेलं आणि माझ्या आवडत्या  पु. लं नी संगीतबद्ध केलेलं हे गीत. हे माझ्या आजीचंही आवडीचं गीत म्हणून जास्त लक्षात आहे!  आजीचा आवाज सुरेल, त्याला भरपूर चढ होता. तिला गाण्याची प्रचंड आवड. पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तिला जेमतेम गोल साडी नेसून कॉलेज ला इंटर पर्यंत शिकण्याची काय ती मुभा मिळाली होती. गाणं शिकणं तर दूरची गोष्ट. नाही म्हणायला आजीचे माहेरी भरपूर लाड झाले. माझे पणजोबा म्हणजे डहाणू चे अण्णा चौबळ. पुढे मुंबईला येऊन स्थिरावले. चार मुलांनंतर आजी पहिली मुलगी, त्यामुळे तिच्यावर अण्णा आजोबांचा विशेष जीव! तिला एकटीलाच फक्त रोज चांगलं तांब्याभर धारोष्ण दूध प्यायला मिळायचं म्हणे. तिला घरातले सगळे जण ताई म्हणत. तेव्हाच्या परिस्थितीत मुंबईत देखील मुली परकर पोलक्यातून सरळ नऊवारीत प्रवेश करायच्या आणि संसाराला लागायच्या. पण अण्णा आजोबांनी आजीला आवर्जून एस.एन. डी. टी कॉलेजात घातलं. त्यावेळी तिचे मोठे भाऊ तिला लुगडं नेसून कॉलेज ला जायला लावायचे. चक...

ती गेली तेव्हा...

हे असं कधीतरी होणार हे माहित होत. ही वेळ आता लवकर येइल हे ही कळत होत तरी तो विचार त्या त्या वेळी किती जीवघेणा वाटत असे. लता नसेल तेव्हा?? हा प्रश्न कितीदातरी मनात यायचा. धास्तावलेलं मन मग 'पण ती आहे ना? पुढचं पुढे' अशी तोकडी समजूत घालायचे. लहानपणापासून तिचा माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो ह्याचं मला कोण कौतुक वाटत असे! नुसत्या त्या एका गोष्टीवर मी स्वत:ला सेलिब्रिटी समजायला लागले होते. लता विरुद्ध आशा ह्या वादामध्ये तेव्हा मी हिरीरीने लताचा पक्ष घेत होते..आशाताई पण प्रचंड आवडत असून सुद्धा! लतादीदी आणी माझं एक स्पेशल नाते मनात ठाण मांडून बसले होते. माझ्या आजीच्या पिढीला तिने त्यांच्या उमेदीच्या वर्षात साथ दिली आणी माझ्या आईच्या आणी माझ्या पिढीला घडवलं. ह्या एका गोष्टीवरून तिच्या प्रतिभेची व्याप्ती लक्षात यावी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत मीराबाई हे सगळे ह्या दोन पिढ्यांना मंगेशकर घराण्यामुळे आकळले. घनश्याम सुंदरा ह्या भूपाळीने अगणित वेळा उठवलंय. निळ्या पहाटवाऱ्यात तिच्या स्वर्गीय आवाजाने जागृत होणारं घर आजही आठवतं. सन्ध्याकाळी दिवे लागणीला ऐकलेल्या पसायदानाने भ...